Saturday, October 20, 2018

कृषि स्वावलंबन योजना 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना-

या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार) , इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सूक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच- रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच रु.25 हजार) यासाठी अनुदान दिले जाते. राज्यातील मुंबई वगळता सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत देय अनुदानाची रक्कम, आरटीजीएसद्वारे थेट त्याच्या बँक खात्यावर देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष :-

1) लाभार्थी अनुसुचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
2) लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
3) जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
4) लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत.
5) उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
6) लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टरपर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर असणे बंधनकारक आहे)

6 comments:

  1. Open castla ky gajar detav ka😡

    ReplyDelete
  2. OPen वाल्यांनी काय घोड मारलंय

    ReplyDelete
  3. ज्यांना शेती आहे त्यांना विहीर द्या ते काय घरात विहीर खोदतील का? ह्यात पण जात आनलेच यांनी

    ReplyDelete
  4. Open sathi Kay aahe?
    Fakt kordvahu seti karun marayche ka?
    Yojana rabavatana jat kashala pahata....Sheti paha Bagayati aahe ki kordvahu

    ReplyDelete
  5. Open sathi Kay aahe?
    Fakt kordvahu seti karun marayche ka?
    Yojana rabavatana jat kashala pahata....Sheti paha Bagayati aahe ki kordvahu

    ReplyDelete